प्रतिनिधी /माली पाटील
लो.भा.न्युज- नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही पिक विमा मिळाला नसल्याने अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व पत्रकार संघटना यांनी वारंवार निवेदणे व तक्रारी शासनाकडे केली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे भेट देऊन शेतकऱ्याचा व्यथा मांडल्या पिक विमा भरपाईं न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबर पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारी कराव्यात असे आव्हान जिल्हाधिकाऱ्याने केले आहे .
वर्ष २०२३ च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील आठ लाख १९ हजार ५९० शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा काढला होता. त्याच वर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी दोन लाख ५० हजार २० दावे विमा कंपनीकडे दाखल केले होते. त्यापैकी एक लाख ९७ हजार २९९ दावे मान्य करून १५४.६७ कोटी मंजूर करण्यात आली होती. जुलैतील नुकसाना नंतर उत्पन्नात ५० टक्के पेक्षा अधिक घट होईल हे विचारात घेऊन अनुज्ञ विमा दाव्याच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचा निर्णयानुसार २९६.३६ रुपयाची रक्कम मंजूर होऊन त्यापैकी २९२.५९ कोटी रुपयांचे वितरण केले.
दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा न मिळाल्याच्या किंवा कमी भरपाई मिळाल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या.काही जनानी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे केले गेल्या होत्या. बैठकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडली होती. त्या अनुषंगाने खासदार चव्हाण यांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राहून त्यांचे भेट घेऊन या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत विचार निर्णय केला. या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील दहा दिवसा पूर्वी म्हणजे ३ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन केले शेतकऱ्याच्या तक्रारी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.